Friday, September 26, 2025
उपवासाची गंम्मत..
उपवासाची गंम्मत*
काल मी एका ठिकाणी सामूहिक संवाद साधण्यासाठी गेलो होतो. तेथे महिला, पुरुष, लहान मुले, काही जाणकार मंडळी हि उपस्थित होत्या. विषय होता *आत्मपरीक्षण.* आपल्याला नक्की काय हवे आहे? ते कसे मिळवायचे? त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात? त्यातून काय साध्य करायचे? आणि ते नेमकं कोणासाठी?
संवाद सुरुवात करत असताना एका व्यक्तीने मला प्रश्न केला उपवास करावा? उपवास करावा की नको? त्यावर मी काही बोलण्या अगोदर तेथील उपस्थित महिला मंडळींनी त्यावर चर्चा सुरु केली मी त्यांच्या चर्चा थांबवत बोललो.
काही दिवसांपूर्वीच मराठी महिन्यातील सर्वात जास्त उपवास असणारा श्रावण महिना संपला आहे. श्रावणात मोठ्या प्रमाणावर उपवास केले जातात. काही व्यक्ती तर अखंड श्रावण महिनाभर उपवास करतात तर काही जण फक्त श्रावणातील काही दिवस. (सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, रविवार) काहीजण वर्षभर आठवड्यातील एक दिवस तर काहीजण दोन दिवस नियमित उपवासाची सुरुवात करतात असो.
आता सर्वत्र शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणावर पार पडताना दिसत आहे. यामध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने देवीची उपासना करतो आहे. परंतु बऱ्याच जणांना मी पाहिले की अंधानुकरण करत देवीची उपसना करताना दिसतात. यामध्ये उपवास मोठ्या प्रमाणावर केले जातात. त्यांच्या काही उपवास करण्याच्या गंमती येथे सांगत आहे.
पहिली महिला तिच्या ऑफिसमध्ये काम करते ती म्हणाली मी नऊ दिवस कडक उपवास करते पायात चप्पल देखील घालत नाही. मी तिला म्हणालो फारच कडक उपवास करता तुम्ही. मग इतर वेळी किचनमध्ये स्वयंपाक करत असताना किंवा घरात सर्वत्र चप्पल घालून फिरता ते चालतं का तुम्हाला? त्यावर त्या महिलेकडे उत्तर मिळाले नाही.
दुसरी महिला म्हणाली सर मी फक्त फळे खाऊन उपवास करत आमच्याकडे दुसरं काही खाल्लेलं चालत नाही. मी म्हणालो खूप छान. दररोज किमान एक फळ खाण शरीराला उत्तम असते. परंतु तुम्ही नवरात्र उत्सवाच्या एक-दोन दिवस अगोदर दिवसातून दोन-तीन वेळा व्हेज-नॉनव्हेज पोटभरून खाल्लं कारण दहा दिवस खाता येणार नाही त्याचं काय? यावर त्या महिलेकडे उत्तर नव्हते.
तिसरी महिला म्हणाली सर आम्ही घरात देवीदेवता यांची गाणी लावतो संपूर्ण गल्लीत आवाज असतो आमच्या गाण्याचा. त्यावर मी म्हणालो या शारदीय नवरात्र उत्सवात देवी नऊ दिवस तपस्चर्या करत आहे. जो म्हैशासूर नावाचा राक्षस वेगवेगळी रूपे घेत आहे. तो नक्की कोठे आणि कोणत्या रूपात आहे हे शोधत आहे. अशा वेळी शांततामय वातावरण असायला हवे असे मला वाटते? या प्रश्नवार देखील त्या महिलेकडे उत्तर नव्हते.
आता तर या नऊ दिवसात दररोज वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची नवीनच प्रथा सुरु झाली आहे. त्या रंगाचे कपडे घालण्यासाठी घरात वादविवाद सुरु आहेत. एखादा दिवस त्या रंगाचे कपडे घालण्यासाठी नाही मिळाले तर इतरांकडून उसणवार करून किंवा उसणे पैसे घेऊन किंवा उसणे कपडे घेऊन घेतले जातात. आणि यदा कदाचित एखाद्या वेळी अमुक एका रंगाचे कपडे नाही मिळाले तर संपूर्ण दिवस महिला अशांत, चिडचिड, रागराग करत आहेत. ज्या घरात शांत वातावरणात देवीची पूजा व्हायला हवी तिकडे जर अशी अशांतता असेल असेल तर कसे चालेल.
वरील काही उदाहरणावरून मला उमजत नाही की आपल्याला स्वतः नक्की हवं आहे तरी काय? हेच अनेकांना माहित नाही. आपण खरंच आतापासून स्वतः नक्की काय हवे आहे याचे *आत्मपरीक्षण* करणे गरजेचे आहे असे मला कटाक्षाने वाटते. समाजात, इतरांना दाखवण्यासाठी जे काही अंधानुकरण मोठ्या प्रमाणावर सुरु आहे ते कोठे तरी थांबायला हवे. एवढीच माफक अपेक्षा येथे व्यक्त करून माझ्या लेखाला पूर्णविराम देतो.
*-श्री. मंगेश कल्पना विठ्ठल कोळी.*
मु. पो. ता. शिरोळ.
जि. कोल्हापूर
*मोबाईल- 9028713820*
=========================*~
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment