Sunday, December 13, 2020

पहाटेची ताकद...

 

*तुम्ही सकाळी किती वाजता उठता?*

*हेल एरॉल्ड* नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, ते एक प्रचंड यशस्वी व्यावसायीक होते, मोठ्या जिद्दीने त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारिरीक विकलांगतेवर मात केली होती.

पण २००८ च्या महामंदीत त्यांचा प्रचंड लॉस झाला, अब्जोपती हेल कर्जबाजारी झाला.पण तो हार मानणारा नव्हता, यातून बाहेर कसं पडावं, हे विचारण्यासाठी तो आपल्या एका यशस्वी मित्राकडे गेला, मित्राने त्याला काय सल्ला दिला असेल बरं?

*“हेल, तु सकाळी लवकर उठ!”* “बाकी सगळं आपोआप होईल”या चमत्कारिक सल्ल्याने हेल निराश झाला, त्याला काहीतरी आगळेवेगळे उपाय अपेक्षित होते,काही दिवस त्याने कसेबसे ढकलले, पण दिवसेंदिवस निराशा त्याला घेरत होती, मग नाईलाज म्हणुन *त्याने सकाळी चार वाजता उठायची सुरुवात केली,* आणि हेल सांगतो, त्याचं आयुष्यच बदलुन गेलं!

*पहाट आणि सुर्योदय इतके जादुई असतात का?*

इतक्या सकाळी उठुन काय करावं? ह्या प्रश्नावर हेल ने एक कोडवर्ड सांगितलाय.

*‘SAVERS’*

*ह्या आयुष्य बदलुन टाकणार्‍या सहा सवयी आहेत.*

१) *Silence – (ध्यान)*

- शांत बसुन स्वतःच्या आत डोकावणे, म्हणजे ध्यान!

- स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे, म्हणजे ध्यान!

- मनाच्या कॉम्पुटरला फॉर्मेट करुन व्हायरस रिमुव्ह करणे म्हणजे ध्यान!

- मन प्रफुल्लीत आणि ताजतवानं करण्यासाठी आवश्यक असते ध्यान!

- माणसाच्या गरजा किती कमी आहेत, आणि सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत याची आत्मप्रचिती म्हणजे ध्यान!

- अफाट, अदभुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत स्वतःला जोडून घेणे, आणि स्वतःच्या मन-शरीराचा कणकण प्रफुल्लित करवुन घेण्याची कृती म्हणजे ध्यान! 

२) *Affirmations – (सकरात्मक स्वयंसूचना)*

- अफरमेशन्स म्हणजे स्वसंवाद!

- स्वतः स्वतःला सुचना देणं,

- प्रचंड शक्तिशाली असलेल्या अंतर्मनावर आपण निश्चित केलेलं ध्येय कोरणं!

- येत्या पाच वर्षात, येत्या एक वर्षात, पुढच्या एका महिन्यात, पुढच्या एका आठवड्यात, आणि आज दिवस भर मी काय काय करणार आहे, याचं मनातल्या मनात पुन्हा पुन्हा रिव्हीजन करणे म्हणजे स्वयंसूचना!

*- स्वयंसुचनांमुळे कल्पना खोल अंतर्मनात झिरपतात, आणि नाटकीयरित्या सत्यातही उतरतात.*

- अंतर्मनाची शक्ती प्रचंड असल्यामुळे तिथे रुजलेला प्रत्येक विचार मग तो चांगला असो की वाईट, खराच होतो.

*- एखादी गोष्ट हजारो वेळा बोलली तर ती अंतर्मनात प्रक्षेपित होते, मग अशुभ कशाला बोलायचे?* 

- वाईट बोलुन विनाशाला आमंत्रण देण्यापेक्षा, ‘या सुखांनो या’!... 

३) *Visualize – (चांगल्या कल्पना मनात घोळवणे.)*

तीव्र इच्छा पुर्ण झाली आहे, अशी मनातून कल्पना करणं, ती पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करणं आणि मनःपटला वर तिला बारीक सारीक रुपात साकारणं, म्हणजे व्हिज्वलायजेशन!

*- कल्पनाशक्ती ही निसर्गाने माणसाला दिलेली सर्वात अनमोल आणि सर्वात प्रभावशाली भेट आहे.*

- कल्पनाशक्तीचा योग्य वापर केल्यास साधारण माणसाचं यशस्वी व्यक्तीमध्ये रुपांतर होतं.

- दररोज आपण आपली ध्येयं पूर्ण झाली आहेत, असं मनात घोळवलं पाहीजे.

पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदकांची रास उभी करणारा मायकेल फेल्प्स म्हणतो. ज्यावेळी मला झोप येऊ लागते, तेव्हा मला जे नक्की करायचे आहे, ते मनातल्या मनात बघण्याचा मी प्रयत्न करतो.

- ऑलंपिकविजेती एथलिट लेन बीचले म्हणाली होती, मागचे चार वर्ष मी एकच निकाल डोळ्यापुढे आणत होते, ते म्हणजे, मी हातात विजेतापदक घेऊन उभी आहे, आणि माझ्यावर शॅंपेनचा वर्षाव होत आहे.

- मायकेस स्मिथ म्हणाला, मी मला हवे असलेल्या स्वप्नाचे रेखाचित्र कागदावर रेखाटतो, स्वप्नांबद्द्ल टिपण लिहतो, आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डोळ्यांसमोर उभे करतो.

- प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजींना त्यांच्या यशाचे रहस्य विचारले तर ते म्हणाले, *“यश दोनदा मिळते, एकदा मनात आणि दुसऱ्यांदा वास्तव जगात!”* 

४) *Exercise – (व्यायाम)*

*- शरीरातून आळसाला पळवून  लावण्यासाठी, शरीरातील उर्जा वाहती ठेवण्यासाठी, मनाने कणखर आणि आनंदी राहण्यासाठी आवश्यक असतो, व्यायाम!*

*- शरीर आळसावलं की मन भ्रष्ट झालंच समजा!*

*- व्यायाम, योगासने, प्राणायाम यांच्या माध्यमातून उर्जेला वळण न दिल्यास ती अतिरिक्त बाबीकडे वळते, आणि माणूस वासनांचा गुलाम बनतो.*

- वाईट सवयींचा गुलाम झालेल्या माणसातले चैतन्य हरपते, अशा व्यक्तीला एकाकी असल्याची जाणीव अस्वस्थ करते.  

- तो कशावरच एकाग्र होवू शकत नाही, आणि म्हणून तो आनंदी होवू शकत नाही, मनात एक अनामिक भय तयार होते.

- ह्या सगळ्या दुष्ट श्रंखलेला तोडण्याचा एकच उपाय, तो म्हणजे, व्यायाम करा, डिप्स मारा, सूर्यनमस्कार घाला, पुलअप्स करा, ट्रेडमिलवर घाम गाळा,प्राणायाम करा.  शरीरातले चैतन्य जिवंत ठेवा.

५) *Reading – (वाचन)*

*- पुस्तकं वाचणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतात.* 

- पुढच्याच ठेस, मागचा शहाणा, ह्या न्यायाने दुसर्‍यांच्या अनुभवाने शहाणे होणारे लोक जगावर राज्य करतात.

*- वॉरेन बफे, बिल गेटस, मार्क जुकरबर्ग हे सगळे आठवड्याला दोन पुस्तके वाचून पूर्ण करतात.*

६) *Scribing – (लिहिणे.)

*- लिहिल्याने तुमची तुमच्याशी नव्याने भेट होते.*

- लिहिल्याने मन रिकामे होते, दुःख नाहीसे होते, मनात नव्या उर्जेचा संचार होतो.

- लिहल्याने नवे रस्ते उघडतात, नव्या प्रगतीच्या वाटा खुलतात.

- संतानी सांगून ठेवले आहे, दिसामाजी काहीतरी लिहीत जावे.

*- लिहणं, हे सुद्धा स्वसंवादाचं प्रभावी साधन आहे.लिहिल्याने विचार पक्के होतात.*

*- सकाळी उठल्यावर आज दिवस भर मी काय करणार आहे, ते लिहावं,*

- एखादी समस्या छळत असेल तर ती लिहून त्याचे उपाय लिहावेत.

- मनाला स्वप्नांच्या आकाशात मुक्त पणे पाठवून कागदावर स्वप्ने रेखाटावीत.

- ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी काय काय करणार आहे, त्याचं प्लानिंग, नियोजनही लिहावं,

-  रोज स्वतःला कामे नेमून द्यावीत, आणि पूर्ण झाली की स्वतःला विजयी घोषित करावं.

*- लिहिल्यानं मन मोकळं होतं, चिंतांचं ओझं हलकं हलकं होतं!*

- जवळच्या व्यक्तीला पत्रं लिहावीत, कधी प्रेरणादायक किस्से कहाण्या लिहाव्यात.

- अशाने अंतरंग फुलुन येतात, उर्जेचा स्रोत खळखळत वाहतो.

*ह्या सहा सवयींपैकी प्रत्येक सवय आयुष्य बदलून टाकणारी आहे. वरील सहा सवयींपैकी किती सवयी तुम्ही स्वतःला लावून घेतल्या आहेत.*? 

 आता आपल्यापैकी प्रत्येकाकडे भरपूर रिकामा वेळ आहे...तो वेळ नकारात्मक पोस्ट वाचून त्यावर चिंतन करण्यात वाया घालवावा की वरील पैकी कोणत्याही एका किंवा जमत असल्यास सर्वच गोष्टी अमलात आणण्यासाठी प्रयत्न करायचा हे सर्वस्वी आपणच ठरवायचे आहे.

कोणतीही गोष्ट अंगवळणी पाडण्यासाठी किमान 21 दिवसांचा सराव आवश्यक असतो...आणि आपल्याकडे आता कदाचित 21 पेक्षा जास्त दिवस रिकामे असणार आहेत..

तेव्हा या वेळेचा सदुपयोग करून भावी जीवनासाठी सशक्त मन आणि सशक्त शरीर बनवू....

अशी वेळ व संधी पुन्हा येणार नाही व ती येऊ ही नये.....

वेळ आहे स्वतःवर काम करण्याची....स्वतःसाठी जगण्याची.....आलेल्या परिस्थिती चा फायदा करून घेण्याचा.. 

*काळजी घ्यायची आहे, काळजी करायची नाही.*


Sunday, November 29, 2020

व्यक्तिमत्त्व विकास दिवाळी अंक 2020 प्रतिक्रिया

 नमस्कार,

   मी कवी सुरज अंगुले...

             व्यक्तिमत्व विकास दिवाळी अंक 2020 प्रकाशित करत असताना संपादक, उपसंपादक शब्द जुळवणे तसेच तुमची इतर सहकारी अतोनात प्रयत्न केलेत त्यामुळे तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. कोरोनाच्या काळात आर्थिक अडचणीमुळे आपण प्रिंटेड अंक काढू शकला नाहीत म्हणून आम्ही समजून घेतो. 

         आतापर्यंत आपण कारकिर्दी केलेली सर्वोत्तम आहे, महाराष्ट्रामध्ये संपादक श्री. मंगेश विठ्ठल कोळी यांनी आमच्यासारख्या नव युवकांना किंवा नवोदित कवींना आपल्या अंकामध्ये संधी देऊन आमचा आनंद द्विगुणित केला म्हणूनच तुमचा सार्थ अभिमान कायमस्वरूपी आहे. तुमच्या सोबत खूप कलावंत, विचारवंत, साहित्यिक, पत्रकार, लेखक जोडले गेले आहेत हेच तुमचं भाग्य आहे. 

         आतापर्यंत आम्ही भरपूर ठिकाणी कविता लेखी चारोळ्या दिलेल्या आहे. परंतु तुमच्यासारखी सुविधा अद्यापपर्यंत आम्हाला मिळालेले नव्हती. एकंदरीत विचार जर केला तर, त्याचा खर्च पाहिला तर खूप आहे. परंतु तुम्ही निस्वार्थ केलात. त्यामुळे असा संपादक पुन्हा होणे नाही. असं माझं वैयक्तिक मत आहे. 

          प्रमाणपत्राची सजावट त्याची संकल्पना त्याचे चिन्ह त्यावर असलेल्या स्वाक्षरी पाहिल्यानंतर खूप खूप आनंद वाटला. तुम्ही अशा पद्धतीने काम करत आहात म्हणून आम्ही तुमच्या सोबत कायम आहोत. 

          पुढील कार्यासाठी मनापासून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा... असाच संपादक म्हणजे महाराष्ट्राला खरा लाभलेला अभिनेता आहे. तुमचे कार्यप्रणाली इतकी सुंदर आहे, मी ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. 

        पुढील काळामध्ये माझ्याकडून साहित्य क्षेत्रामध्ये जेवढे योगदान देतो, ते फक्त तुम्ही विश्वासाला माझ्या पात्र असल्यामुळे मी देत आहे. ✍🏻🌷🌷🙏🏻

Saturday, November 21, 2020

ओवाळणी..!!

 

यावर्षी माहेरी जायला जमलं नाही म्हणुन.. घरी आलेल्या भावाला.. हॉलमध्ये पाट रांगोळी घालून नवऱ्यासमोरच औक्षण करुन तिनं त्याला ओवाळलं, तसा तो उठून उभा राहिला शर्टच्या खिशातून ओवाळणीचं पाकीट काढून हळूच तबकात ठेवत.. खाली वाकून चरणस्पर्श करीत त्यानं बहिणीला नमस्कार केला, अरे असू दे! तू बस! मी फराळाचं आणते!म्हणत तिनं औक्षणाचं तबक उचललं, तसा तो घाईघाईत म्हणाला, ताई फराळाचं राहू दे! तेव्हढा वेळ नाहीये! कामावर जायला उशीर होईल! पुन्हा येईल मी! असं बोलून तो दारापर्यत गेला सुद्धा..अरे! थांब जाऊ नकोस तसा.. थोडं फराळाचं देते! ते तर् घेऊन जा! आलेच मी... बहिणीनं त्याला थांबवलं होतं.....

बहिणीनं दिलेली फराळाची पिशवी घेऊन तो निघाला होता.. कांही अंतर गेल्यावर मोबाईलची रींग वाजली.. त्यानं पाहिलं.. ताईचा फोन होता.. बहिणीचा फोन येईल याची जणू त्याला अपेक्षा केली असावी.. रस्त्याच्या कडेला थांबून त्यानं.. मोबाईल कानाला लावला... गळ्याशी दाटलेला हुंदका कसातरी थोपवत.. बहिणीनं तिकडून कांही बोलायच्या आत कंठ दाटलेल्या आवाजात त्यानं बोलायला सुरवात केली...

ताई! माफ कर मला! तुला ओवाळणी घालायला माझ्या जवळ पैसे नव्हते.. तबकात ठेवलेल्या पाकिटात काहींचं नव्हतं! पुढचं बोलणं त्याला अवघड जातं होतं.. मोबाईल कानाला लावून तो तसाच उभा होता... अरे वेड्या! पलिकडून गहिवरून आलेल्या बहिणीचे स्वर कानी येतं होते.... खिशातलं पाकीट काढतांना थरथरणारा तुझा हात!तुझ्या चेहऱ्यावर दिसणारे भाव! निघण्याची केलेली घाई पाहूनच!तू काहीतरी लपवतो आहेस वाटलंच होतं! आत जाऊन फक्त खात्री केली! अरे! आता अनलॉक झालं असलं तरी तुझा गेलेला जॉब अजुनही तुला मिळालेला नाहीये! माहिताय मला!कामावर जायला उशीर होईल! हा बहाणा सुद्धा ओळखला होता! तुझी बहीण आहे मी...

ताई तू समजुन घेतलंस! पण तिथं बाजुला भाऊजी बसलेले!त्यांच्या लक्षात आलं असतं तर? नोकरी अभावी फार बिकट परिस्थिती झालीय गं आमची! कामावर परत बोलावण्याची आशा मावळल्या सारखं झालंय! बायको मुलांसह संपवावं सगळं ! असं वाटतं! नको असं जगणं...

शू! चूप बस्स! असं अभद्र बोलू नकोस! सगळं चांगलं होईल!असा धीर सोडू नकोस! अरे माझ्याकडे बघ! आम्ही सुद्धा कसबसं तोंड देतोय आल्या दिवसाला! नोकरी आहे पण अर्धाच पगार मिळतोय ह्यांना! तुला एक सांगू! भाऊबीजेला येण्याचं मुद्दाम टाळलं मी ! उधार उसनवार करुन तुम्ही केलंही असतं माझं सगळं! नाही पटलं ते मनाला! ह्यांनी सुद्धा माझा निर्णय योग्य ठरवला! उलट आपल्याकडून होता होईल तितकी मदत करूया! असं ठरवलं ह्यांनी! तुला संकोच वाटेल म्हणुन तुझ्याशी नाही बोलले हे! आता सुद्धा फराळा बरोबर तुझ्या ओवाळणीच्या रिकाम्या पाकिटात थोडे पैसे ठेवलेत ते नीट सांभाळ! आणि असा खचून जाऊ नको रे! आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी! सगळे दिवस सारखेच नसतात! आणि हो!या भाऊबीजेची ओवाळणी म्हणुन एक वचन दे मला! इथून पुढं कुठलाही वाईट विचार आणणार नाहीस मनांत! शांतपणे घरी जा! तुझे भाऊजी नेहमी म्हणतात ना! तसं म्हणते मी.......be happy.......

be positive........

बहिणीचं बंधूप्रेम आणि भ्रमण ध्वनीच्या सूक्ष्म लहरींनी खूप चांगलं काम केलं होतं आज..खचलेल्या एका भावाला नव्यानं उभारी देण्याचं..

(वरील लेख मी लिहिलेला नाही, सुंदर आणि कमी शब्दात भाऊबहिण नाते सांगण्याचा उत्तम प्रयत्न आहे. असे मला वाटते म्हणून मी आपणास वाचण्यासाठी पाठवत आहे. आवडल्यास इतरांनाही पाठवा)

Wednesday, November 11, 2020

व्यक्तिमत्व विकास दिवाळी अंक २०२०

व्यक्तिमत्व विकास दिवाळी अंक २०२० मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा ही नम्र विनंती...

Wednesday, August 26, 2020

तुमचं हक्काचं ठिकाण...

"अग तुझा चेहरा आज असा का दिसतोय?"

" काही नाही गं..."

" नाही कसं ? काय झालंय..बोल न .."

आणि मग मनात साचलेलं सगळं मळभ तिच्याजवळ रिकामं होतं..एखादी गच्च कोंबून भरलेली बॅग रिकामी करावी तसं आणि  मग जादूची कांडी फिरवल्यागत मन क्षणार्धात एकदम मोकळं होऊन जातं..

हेच.. हेच ते *हक्काचं ठिकाण.. My Happy Place !!* 

         फक्त आठवून बघा अशी कोणती  हक्काची ठिकाणं आपल्या जवळ आहेत ?? मनाला उभारी , खराखुरा विसावा देणारी .. एक एक आठवत चला.. एकदम फ्रेश वाटेल !! त्या व्यक्तीसोबतचे संवाद किंवा गमतीजमती एखाद्या सिनेमासारख्या तुमच्या डोळ्यांपुढून तरळून जातील..कुठल्या एखाद्या मैत्रिणीसोबत मन हलकं फुलकं होतं तर एखाद्या मित्रासोबत खळखळून हसल्या जातं , भावा सोबत बालपणीच्या आठवणी, चिडवाचिडवी..तर एखाद्या नातेवाईकांसोबत साहित्यिक चर्चा...sooo coool असं feeling देणारी ही ठिकाणं !!

              अशी मोजकीच पण हक्काची ठिकाणं प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच असतात..आई वडील तर खास हक्काचेच.. त्याशिवाय मित्र ,मैत्रीण ,भाऊ ,बहीण,

भावजय,दीर,नणंद , cousins ,नातेवाईक .. कुणीही असू शकतं  तुमचं *हक्काचं ठिकाण , Your true Happy Place !!*

     जिथे आपुलकी, जिव्हाळा तर असतोच, पण सोबत असते संजीवनी.. मनाला जिवंत करणारी !! किंवा अगदी एखादा  *व्हॉट्सॲप ग्रुप* सुद्धा.. जिथे नुसतं डोकावलं, नुसता एक virtual  फेरफटका मारला तरी मन एकदम relax होतं !

           निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर एकदम फ्रेश वाटतं तसंच आपल्या या हक्काच्या ठिकाणी.. त्यांच्या सहवासात एकदम relax, fresh वाटतं.. मन  हलकं हलकं होऊन जातं.. अगदी मोरपिसासारखं !! तिथे कुठलाच आडपडदा नसतो  किंवा  show-off ही नसतो.. अगदी मनातलं हृदयातलं सहज बोलता येतं, व्यक्त होता येतं... कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे  तुमच्या अशा हक्काच्या ठिकाणी तुम्हाला समजून तर  घेतल्या जातंच पण महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ह्यांच्याकडून Judge केल्या जात नाही ! आणि म्हणूनच अशा व्यक्तींच्या सहवासात तुम्हाला अगदी निवांत.. मन मोकळं वाटतं..

*"तुमको देखा , तो ये खयाल आया*

*जिंदगी धूप , तुम घना साया !!"*

        ही हक्काची  ठिकाणंही अगदी अशीच..सावली देणारी ,विश्रांती देणारी.. थकल्याभागल्या  जीवाला आणि मनाला !!आणि गंमत म्हणजे अशी माणसं आरशासारखी असतात.. गुण आणि दोष दोन्ही दाखवणारी..म्हणून जास्तं विश्वास !! 

         अशी हक्काची ठिकाणं अगदी जीवापाड जपूssssन ठेवायला हवीत.. हिऱ्या माणकां पेक्षा जास्त !! ती हरवायला नकोत,आयुष्याच्या गडबडीत.. कारण यांची फक्त साथही लाख-मोलाची !! Loneliness किंवा एकटेपणा दूर करणारी..म्हणूनच *"तुझ्याशी बोलून खूssssप बरं वाटतं"* हे त्यांना नक्की सांगायालाच हवं .

       कुणाचीही आत्महत्या कानावर आली की वाटून जातं  की मन मोकळं करायला त्यांच्या जवळ असं एकही हक्काचं ठिकाण नसेल ? जिथे अगदी खरंखुरं व्यक्त होता येईल?कारण व्यक्त होणं ही प्रत्येकाचीच सर्वात मोठी गरज !! त्याशिवाय मोकळा श्वास कसा घेता येणार ? 

        आपण आपल्या आयुष्यातली सगळी हक्काची ठिकाणं तर जपावीच पण आपणही कुणाचं तरी हक्काचं ठिकाण नक्कीच असायला हवं... !! नाही का ?

*खूsssssप बरं वाटलं ना वाचून? मग friends आणि सर्व हक्काच्या ठिकाणांना  जरूर शेअर करा आणि सांगा 'खूsssप बरं वाटतं तुझ्यासोबत' !!*

Friday, July 24, 2020

कोरोनाची भीती नको...

कोरोना हा एक कॉमन कोल्ड आहे. कॉमन कोल्ड म्हणजे साधा सर्दीचा आजार! अनेक ग्रंथामध्ये त्याची ओळख कॉमन कोल्ड या नावाखालीच दिलेली आहे. हा आजार आतापर्यंत अनेकांना कितीतरी वेळा होऊन गेलेला असेल. आणि कित्येकांना लागण होऊनही काहीच लक्षणे न दिसल्याने आपोआप बराही झालेला असेल.
हे मी माझ्या मनाचे सांगित नाही. पद्मश्री डॉ. रमण खंडेलवाल यांची गेल्या चार दिवसापूर्वी माझावर मुलाखत घेतली होती. ते याच क्षेत्रात काम करतात. त्यांनी कोरोना विषयी खूप छान तथ्यात्मक माहिती सांगितली. त्यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या व्हायरसची जरी लागण झाली तरी 80 टक्के लोकांना काहीच लक्षणे दिसत नाहीत. तो आजार येतो आणि चार-सहा दिवसांमध्ये आपोआप निघूनही जातो. 15 टक्के लोकांना सामान्य उपचारांची गरज भासते. तेही साध्या उपचाराने बरे होऊ शकतात. पाच टक्के लोकांच्या बाबतीत मात्र कॉम्प्लेक्स निर्माण होऊ शकतो. पण हे पाच टक्के लोक म्हणजे जे वयोवृद्ध आहेत, ज्यांची प्रतिकारशक्ती अगदी मामुली आहे, ज्यांना डायबिटीस, हृदयविकार, टी.बी. किंवा तत्सम स्वरूपाचा पूर्वीचाच कुठला तरी आजार आहे. अशा लोकांपैकी काही लोक मरू शकतात. हे आहे कोरोनाचे सत्य. म्हणजे सुमारे 95 टक्के लोकांना कोरोनामुळे मृत्यू येण्याची शक्यता जवळ जवळ नगण्य आहे. साध्या उपचारानेही तो बरा होऊ शकतो.

*कोरोनाचा प्रसार*

कोरोनाचा प्रसार हवेतून होत नाही. त्यामुळे आपण एकटे असताना किंवा आपल्या आसपास काही फुटांवर कोणी माणूस नसताना तोंडाला मास्क बांधणे अवैज्ञानिक आहे. कोरोनाचा आकार आहे, शंभर नॅनोमिटर. आणि आपल्या फडक्याची छिद्रे किती मोठी असतात, आपणास माहीत आहेच. मित्रांनो! आपण नव्हतो, तेव्हाही लाखो व्हायरस होते आणि आपण नसल्यानंतरही व्हायरस राहाणार आहेत. या विश्वातील सर्व प्रकारचे पशू, पक्षी, प्राणी, किटक, जिवाणू, विषाणू हे सर्व निसर्गाचे अविभाज्य घटक आहेत. त्यांच्याबरोबरच आपणास आपले जीवन जगायचे आहे. या जगात सुमारे 2 लाख 30 हजार प्रकारचे व्हायरस आहेत. आपण त्यांना टाळू शकत नाही. तर आपण स्वतःला अधिक सामर्थ्यशाली, शक्तीशाली बनवावे लागते. त्याच्या काही पद्धती आहेत.

*डर का माहोल*

अनेक प्रकारच्या रोगांने मृत्यूचा आकडा पाहिला तर कोरोनापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. मात्र कोरोनाने झालेल्या मृत्यूचा स्फोट केला जातोय. जगात कुठेही कोणी कोरोनाने मेले तर लाखो-कोट्यवधी माध्यमांतून त्याची बातमी जगभर पसरवली जातेय. त्यातून एक फार मोठी भिती जनमानसामध्ये पसरली आहे. मरणाच्या बातम्या पुन्हा पुन्हा सांगितल्या जात आहेत. चांगले झालेल्या लोकांचे आकडे फोकस करून सांगितले जात नाहीत.

*भीतीचे परिणाम*

पूर्वी येऊन गेलेल्या साथीवर अनेक मानसशास्त्रज्ञांनी समाजातील लोकांचे सर्व्हे केले तेव्हा लक्षात असे आले की प्लेग, देवी वगैरे आजारांनी मेलेल्या लोकांपेक्षा नुसत्या भीतीने मेलेल्या लोकांची संख्या जास्त होती! कुठल्याही साथीला, आजाराला, परिस्थितीला सामोरे जायचे असते. भ्यायचे नसते. पूर्ण शक्तिनिशी त्याचा मुकाबला करायचा असतो. यातच माणसाचे मनुष्यपण आहे. पण आज जास्तीत जास्त भीतीचे वातावरण पसरवण्याचे काम जणू काय मुद्दाम केले जातेय असे वाटायला लागते. त्याच्या ब्रेकिंक न्यूजचा विषय बनवला गेलाय. सामान्य माणसाला इतर गोष्टींची माहिती नसल्याने भीतीने ते अगदी गांगरून जातात. ही भीती का पसरवली जातेय, त्याचे कारण आहे.

*डर का व्यापार*

जितकी भीत मोठी तितका मोठा व्यापार करता येतो. हे व्यापार कोण करतं, हे आजपर्यंतच्या इतिहासाने पुनःपुन्हा दाखवून दिलेले आहे. या जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ जर कुठली असेल तर ती आहे, (हेल्थ इंडस्ट्री)आरोग्यसेवा व्यवसाय.

*सत्ता आणि सत्य*

विज्ञान हे सत्यावर आणि तथ्यावर चालत असते आणि सत्ता किंवा सरकार हे पर्शेप्शनवर चालत असते. तेव्हा विज्ञान काय सांगते, आजपर्यंत जे जे संशोधन झालेले आहे, ते काय सांगते त्याच्याकडे जरा डोळे उघडे ठेवून पाहायला हवे. वैज्ञानिक तथ्य जर समजून घेतले तर भीतीचे वातावरणही निवळेल आणि जगण्याचा सुंदर मार्गही सापडेल. स्वातंत्र्याच्या वातावरणात मुक्तपणे श्वास घेण्याचे सामर्थ्य निर्माण करणाऱ्या श्रद्धेला आपण जागे करूया. प्रेमाने प्रस्फुरीतच,प्रफुल्लित झालेले आणि ज्ञानाने दिग्दर्शित केलेले विवेकी जीवन आपण जगूया. हे भीतीचे वातावरण(डर का माहोल)योग्य नाही. तो वैज्ञानिक नाही. सत्यावर आधारित नाही. तो एक बाजारू फंडा आहे. सरकार काय सांगते आणि विज्ञान काय सांगते याचा विचार व्हायला हवा.

*माणसे का मरताहेत?*

कोरोना एक कॉमन कोल्ड आहे, तर इतकी माणसे का मरताहेत? असा स्वाभाविक प्रश्न विचारला जातोय.
1. त्याचे उत्तर असे की माणसे नेहमीच मरत असतात. ती जगभर मरतात. कोरोनाच्या नावावर जेवढी मरणे खपवली त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्या आजाराने मरताहेत. संपूर्ण जगातील आकडा इतर रोगांच्या मानाने फारच कमी आहे.
2. ज्या इटलीमध्ये जास्त माणसे मेली कारण इटलीत वृद्ध माणसांची संख्या जास्त आहे. म्हातारी माणसे काहीतरी निमित्त होऊन मरतातच.
3. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे माणसे उपचाराच्या पद्धतीमुळे जास्त मरताहेत! कोरोना झालेल्या माणसांवर जे प्रोटोकॉलनुसार उपचार केले जाताहेत त्यामुळे माणसे जास्त मरताहेत. कारण त्याच्यावर नको त्या औषधांचा मारा केला जातोय. त्यामुळे जीवनशक्ती अगदी कमकुवत होऊन जाते आणि मग शरीर साथ द्यायची सोडून देते. म्हणजे इथे रोगापेक्षा उपाय भयंकर आहे.
गेल्या वर्षी इटलीमध्ये नुसत्या मलेरियाने दोन लाख लोक मेले होते. मात्र त्याच्या अशा बातम्या दाखवल्या नाहीत. त्याच्या ब्रेकिंग न्यूज आल्या नाहीत. म्हणून ते लोकांना माहीत नाही. ईश्वर ना करो, पण इटलीमध्ये अजून मरणाचा आकडा वाढू शकतो. कारण प्रत्येक वर्षी तिथे तेवढे लोक इन्फेक्शनने मरतातच. आय. एल. आय. म्हणजे इन्फ्लुएंझा लाईड इलनेस या आजाराने 20 हजारांहून लोक मेले होते.

*निसर्गाची व्यवस्था*

साथी येतात-जातात, दुष्काळ, महापूर, भूकंप इ. नैसर्गिक गोष्टी घडणे हा एक नैसर्गिक भाग आहे. महामारी हे एक निसर्गाची बॅलन्सिंग व्यवस्था आहे. जेव्हा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होतो, अनेक गोष्टींमध्ये विषमता निर्माण होते, सृष्टीचक्रामध्ये काही वेगळ्या गोष्टी घडू लागतात, तेव्हा अशा घटना घडतात आणि त्याचे बॅलंसिंग साधले जाते. ही व्यवस्थासुद्धा नैसर्गिक नियमाचाच एक भाग आहे.
जन्म-मरण हे चक्र सातत्याने सुरूच आहे. निसर्ग काही आपल्या हातातील गोष्ट नाही. तो सातत्याने वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती आपल्यापुढे निर्माण करीत असतो. त्या परिस्थितीला आपण सामोरे कसे जातो किंवा तिचा मुकाबला कसा करतो, तिला प्रतिसाद कसा व काय देतो, याच्यावर आपले जीवन, जगणे आणि त्याचे परिणाम अवलंबून असतात.

*आपण व्हायरसला मारू शकत नाही*

व्हायरस हे जिवंत व्यक्तिमत्त्व नाही. त्यामुळे त्याला मारू शकत नाही. तो शरीरात गेल्यानंतरच जैविक लक्षणे दाखवतो. आपण व्हायरसपासून पळून जाऊ शकत नाही. घरात कोंढून घेतले तरी आपल्या घरात आपल्या आसपास हजारो-लाखो व्हायरस वावरत असतात! खरे तर व्हायरस हा आपला निसर्गातील एक सोबती आहे, सहचारी आहे. मग आपण काय करायचे? आपण जसे पडणाऱ्या पावसाला थोपवून धरू शकत नाही. तसे व्हायरसला थोपवू शकत नाही. मग पावसापासून संरक्षण करण्यासाठी आपण काय करतो? आपण छत्रीचा वापर करतो. नेहमीसाठी घर बांधून ठेवतो. जेव्हा लढायी सुरू असते तेव्हा आपल्यावर वार होऊ नये म्हणून आपण काय करतो? आपण ढालीचा वापर करतो आणि आलेला वार त्याच्यावर झेलतो. तसेच व्हायरसचा मार झेलण्यासाठी आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती नावाची जी ढाल आहे, तिचा वापर करणे हाच याचा प्रथम आणि शेवटचा सर्वोत्तम उपाय आहे. हा उपाय कोण सांगू शकते? जनमानसापर्यंत कोण घेऊन जाऊ शकते? हे काम डब्ल्यू. एच. ओ. करणार नाही. हे काम इंडियन मेडिकल असोशिएशन करणार नाही. हे काम फक्त आयुष मंत्रालय करू शकते. आता फक्त एकच आशा भारतातील आयुष मंत्रालयावर आहे.

*Corona Is Conspiracy* (करोना एक कट कारस्थान,एक षडयंत्रच)

फरिदाबाद निवासी डॉ. विश्वरूपराय चौधरी यांनी जानेवारीमध्येच सांगितले होते, की कोरोना ही एक काँन्स्पीरसी,कुटील कारस्थान  आहे. आता तर निकारूग्वा, ब्राझील आणि मॅक्सिकोचे अध्यक्षही जाहीरपणे म्हणताहेत की, कोरोना हि काँन्स्पीरसी  आहे. ते एक षडयंत्र आहे!

*कोरोना एक हॉरर पिक्चर*

तुम्ही कधी भुताचा हॉरर सिनेमा पाहिलाय का? आपल्याला माहीत असते की पडद्यावरचे भूत येऊन आपल्याला काहीही करणार नाही. तरीही आपण घाबरलेले असतो. हृदयाचे ठोके वाढलेले असतात. तसे आपल्या घरातल्या टी.व्ही.वर हा कोरोनाचा हॉरर पिक्चर सुरू आहे. घरातल्या छोट्या पडद्यावर आता त्याचा क्लायमॅक्स होत आलाय. काही दिवसांतच त्याचा दी एन्ड होईल! कोरोना हा एक हॉरर पिक्चरसारखाच भाग निर्माण केलाय. लक्षात ठेवा, कोरोना हा एक कॉमन कोल्ड आहे. तो 80 टक्के लोकांना झालेला माहीतही होत नाही. साधा आजार आहे. भिऊ नका. दक्षता घ्या.

*जीवन आणि दक्षता*

फक्त कोरोनासाठीच नव्हे तर जीवनात नेहमीच दक्षता बाळगावी लागते. पदोपदी दक्ष राहावे लागते. थोडेसे लक्ष दुसरीकडे गेले तरी ठेच लागते किंवा खड्यात पाय जाऊ शकतो. दुर्लक्ष झाले तर अपघात होऊ शकतो. दक्षता ही जीवनभर नेहमीसाठी घेण्याची गोष्ट आहे. तशीच दक्षता घ्या. भीती नको. तुम्ही जर भीती बाळगली तर भीतीमुळे जीवनशक्ती म्हणजे प्रतिकारशक्ती कमी होते आणि नको तो आजार चिकटतो. त्यामुळे भीती सोडा आणि दक्ष व्हा!

औषधाने आजार बरा होत नाही

कुठलाही आजार हा औषधाने बरा होत नाही. कारण आपण औषधे खात नाही, म्हणून आजार होत नाही, तर आजाराची कारणे अन्यत्र असतात. शरीर स्वतःहूनच आजार बरा करीत असते. त्यासाठी शरीरातील प्रतिकारशक्ती रात्रंदिवस युद्धपातळीवर काम करीत असते. तिला बलवान बनवणे हे आपल्या हातात आहे. जर युद्ध जिंकायचे असेल तर सैनिकीशक्ती बलवान करावी लागते. तिला योग्य ती हत्यारे व रसद पुरवावी लागते. तसेच शरीराचे आहे. शरीरातील सैनिकी शक्ती बलवान बनवा.

*प्रतिकारशक्तीची त्रिसूत्री*

प्रतिकारशक्ती बलवान बनवण्यासाठी तीन सूत्री कार्यक्रमाचा अवलंब केला तर ती सबळ होऊ शकते.
1. प्राकृतिक आहार – यामध्ये शरीरातील पेशीला 40 प्रकारचे अन्नघटक लागतात. त्या सर्व घटकांची पूर्ती करणाऱ्या गोष्टींचा आहारात समावेश असावा. शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण करणारे जंक फुड, फास्ट फुड खाऊ नये. प्राकृतिक मौसमी फळे, भाज्या आणि धान्ये यांचा आहारात समावेश असावा. रोज पोट भरून फळे व भाज्या प्राकृतिक स्वरूपात म्हणजे कच्या स्वरूपात खावीत. नंतर तुम्हाला जे हवे ते खा. अन्न, पाणी आणि हवा याच्यावर आपले जीवन अवलंबून आहे.
2. योग्य तो व्यायाम – व्यायामामध्ये दम लागेपर्यंत चालणे, सूर्यनमस्कार, आसने, प्राणायाम (श्वासाचा व्यायाम) हा नित्य नियमाने व्हावा. प्राणायाम हा रोगनिवारणाचे कार्य करीत असतो. हवा ही एक दवा आहे.
3. पुरेसा विश्राम – शांत आणि गाढ झोप घ्यावी. अति आवाज, गोंधळ, यांने स्नायू तानलेल्या स्वरूपात राहातात त्यामुळे शरीराला विश्रांतीच मिळत नाही. शरीरातील पेशी-पेशींला विश्रांती मिळाली पाहिजे. ती रोज झोपेत मिळते. पण शांत झोपच लागत नाही. त्यासाठी योगनिद्रेचा अभ्यास करावा किंवा रोज न चुकता जेव्हा जिथे वेळ मिळेल तिथे ध्यान करावे. तुमचे जे आताचे वय आहे, तुम्हास जेवढी वर्षे झालीत तेवढे मिनिटे रोज ध्यान व्हायला हवे. ध्यान करण्यासाठी न हालता स्थिर बसणे आणि येणाऱ्या-जाणाऱ्या श्वासाकडे तटस्थपणे पाहात राहाणे एवढे जरी केले तरी पुष्कळ आहे.
मित्रांनो! आपण माणूस आहोत. माणसाने वेळोवेळी अनेक संकटाशी मुकाबला करीत स्वतःचे अस्तित्व इथंपर्यंत आणलेले आहे. आताही आपण एकोप्याने, एकदिलाने वागून एकमेकाला मदत करीत जगूया. माणसासी माणसाप्रमाणे जगणे आणि निसर्गाची होणारी लूट थांबवणे, एवढे जरी झाले तरी कोरोनाने शिकवलेला तो एक धडा आहे असे म्हणावे लागेल.
स्वस्थ रहो! मस्त रहो!! व्यस्त रहो!!!
(हा लेख मी लिहिलेला नाही.)

Sunday, July 12, 2020

"मानसिक शक्ती" जपून ठेवा.

     आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनांमधून आपल्याला आपली मानसिक शक्ती निर्माण करण्यास मदत मिळत असते. परंतु बऱ्याच वेळा आपल्याकडून चुकून किंवा काही व्यक्तींच्या बाबतीत जाणीवपूर्वक मानसिक खच्चीकरण करण्याची अनेकांची सवय असते. या सवयीमुळे स्वतः च्या आणि इतरांच्या नजरेतून आपल्या विषयीचे मत मतांतर निर्माण होत असते. याचे एक सुंदर उदाहरण म्हणजे हे.
     थंडीचे दिवस होते, डिसेंबरचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवातीचा काळ असावा. हाडे गोठवून टाकणाऱ्या एका कडाक्याच्या थंडीच्या रात्री, एक अब्जाधीश रस्त्यावर एका वृद्ध गरीब माणसाला भेटला. त्याने त्याला विचारले, "तुम्हाला बाहेर थंडी वाटत नाही का? तूम्ही तर थंडीचे स्वेटरही घातलेले नाहीये?"
     तेव्हा त्या गरीब म्हाताऱ्याने उत्तर दिले, "माझ्याकडे गरम स्वेटर नाही परंतु मला थंडीची सवय आहे." अब्जाधीश म्हणाला, "थांबा मी आता घरी जातो आणि तुमच्यासाठी एक चांगले गरम स्वेटर घेऊन येतो."
     थंडीपासून संरक्षण देणारे स्वेटर मिळणार या विचाराने तो गरीब म्हातारा खूप आनंदित झाला आणि म्हणाला की "साहेब खूप उपकार होतील." अब्जाधीश घरी गेल्यावर काही तरी कामात स्वेटर चे विसरून गेला.
     सकाळी त्याला त्या गरीब म्हातार्‍याची आठवण झाल्यावर तो स्वेटर घेऊन तो म्हातारा रात्री ज्या जागी भेटला तिथे गेला. परंतु म्हातारा जीवघेण्या थंडीने कडकडून मरण पावला होता.
   अब्जाधीश माणसाला त्याच्या प्रेताजवळ एक चिट्ठी दिसली. त्याने ती चिठ्ठी वाचली. त्यात लिहिले होते, “साहेब जेव्हा माझ्याजवळ गरम कपडे, स्वेटर नव्हते तेव्हा माझ्याकडे थंडीविरुद्ध लढण्याचे मानसिक शक्ती होती. परंतु जेव्हा तुम्ही मला गरम स्वेटर देण्याचे आश्वासन दिले तेव्हा आता थंडी पासुन संरक्षणासाठी एक छान गरम स्वेटर मिळणार या आशेने माझी थंडी विरुद्ध लढण्याची मानसिक शक्ती संपली."
     जर आपण एखाद्याला दिलेला शब्द, आश्वासन, वचन पाळू शकत नसू तर ते देऊ नका. दिलेला शब्द आपल्यासाठी जरी महत्वाचा नसला तरी तो दुसर्‍या एखाद्या गरीब, लाचार व्यक्तीसाठी बरंच काही असू शकतो. कोणाच्याही भावनांशी, अपेक्षांशी खेळू नका. एखाद्याच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत तरी ठीक आहे, परंतु समोरच्या व्यक्तीला अपेक्षेवर ठेवू नका.
- मंगेश विठ्ठल कोळी.
मो.- 9028713820