Monday, August 14, 2017

प्रिय आमुचा  राष्ट्रध्वज....

उद्या संपूर्ण देश स्वातंत्र्य उत्सव साजरा करणार आहे. परंतु अनेकांना आपला राष्ट्रध्वजाची परिपूर्ण माहिती नाही. या स्वातंत्र्य दिनी पूर्व संध्येला आपला राष्ट्रध्वजाची माहिती देण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न. भारतीय राष्ट्रध्वज 22 जुलै 1947 रोजी, भारत देशाला स्वातंत्र मिळण्याच्या 24 दिवस आधी, अंगिकारला गेला.  भारतीय राष्ट्रध्वजात गडद भगवा, पांढरा हिरवा ह्या तीन रंगांचे आडवे पटटे आहेत ज्यामुळे त्याला पुष्कळदा तिरंगा असेही संबोधले जाते.  मछलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे.  भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी उंचीचे प्रमाण 3:2 असे आहे, भारतीय राष्ट्रध्वजाच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे.
रचना- पिंगली वेंकय्या ह्यांनी रचलेल्या भारतीय राष्ट्रध्वजात गडद भगवा, पांढरा हिरवा हे तीन रंग आहेत.  पांढ-या रंगाच्या पट्टयाच्या मधोमध निळ्या रंगांचे अशोक चक्र आहे. भारताच राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा,हिरवा आणि निळा.खरे पाहता आपला राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे.  22 जुलै 1947 रोजी घटना समितीच्या बैठकीततिरंगी ध्वजभारताचा अधिेला गेला आहे. केशरी, पांढरा,हिरवा आणि निळा.खरे पाहता आपला राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे.  22 जुलै 1947 रोजी घटना समितीच्या बैठकीततिरंगी ध्वजभारताचा अधिकत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकत करण्यात आला.  त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहर यांनी मांडला.  एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्टयांचा तो आहे.  वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत.  मधल्या पांढ-या पट्टयावर निळ्या रंगाचे धम्मचक्र असून ते सारनाथ येथे आढळलेल्या सिंहमुद्रेवर असलेल्या अशोकचक्रासारखे हे. चक्राला 24 आरे आहेत.  डॉ.एस राधाकष्णन् यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे.  ध्वजात तीन समान आडव्या पट्टयांची रचना करण्यात आली आहे.
वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.  या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.
मधल्या भागात पांढरा रंग आहे.  या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य पावित्राचा बोध होतो.
खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भ्ाूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा समध्दीचा बोध होतो.
निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे  अथांगता, कालचक्राच त्यासोबत बदलत जाणा-या जगाचं सूचन करतो.  जीवन गतिमान असावे भारतीयांनी शांततापूर्णतेने आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलत: हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणा-या बौध्द धर्माचे धम्मचक्र आहे.  त्यालाअशोकचक्रया नावाने ओळखले जाते.  त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास संस्कती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो.  धम्मचक्र प्रवर्तनायहे घोषवाक्य भारतीय संसद सभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे.
राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली - देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत.  केंद्रीय गह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे.  ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी नागरिकांना माहिती असते.  संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कतिक मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा झेंडा हातात घेउन फडकवताना दिसतात. मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात.  ते टाळले पाहिजे.  प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग कर नये.
ध्वजसंहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे.  राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला पाहिजे की, तो सगळ्यांना दिसला पाहिजे.  शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रथा आहे.रविवार अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे.
स्ंहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे.ध्वज फडकवताना उतरवताना बिगूल वाजविलाच पाहिजे. ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा. राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पध्दतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे.  अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे भिंतीवर आडवा फडकविला पाहिजे.  कुठ्लया पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक वेगळ्या पध्दतीने फडकविला गेला पाहिजे.  ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा त्यावर फडकवावा.
स्ंहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठ्लया मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा.  जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये.  कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये.  इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.
राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी कर नये.  केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाउ नये.  तसेच राष्ट्रध्वजाला माती पाण्याचा स्पर्श होउ देउ नये.  ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पध्दतीने बांधला पाहिजे.  ध्वजाचा दुरपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे.  त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग कर नये.  ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे,जहाजावर लावला जाउ शकत नाही.
ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी कर नये.  कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही.  तसेच राष्ट्रध्वज गादी, रमाल अथवा नॅपकीनवर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठलेही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही.  ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.
केवळ प्रजासत्ताक दिन स्वातंत्र दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो.  राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील.  जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल तो सावधान स्थितीत उभा राहिल.  सरकारी अधिका-याच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे.  आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देउ शकतात.
1.         1906 साली भारतीय ध्वजात तीन रंगांच्रा समावेश केला गेला.  सर्वात वरती गडद निळा रंगाचा पट्टा. त्यामध्ये 8 चांदण्या, मध्यभागी पिवळ्या रंगाचा पट्टा त्यामध्ये देव नागरी भाषेद वंदेमातरम लिहिले होते.  शेवटी सर्वात खाली लाल रंगाचा पट्टा त्यामध्ये एका बाजूला सूर्य दुस-या बाजूला चंद्र होता.
2.         1907 साली भारतीय ध्वज पुन्हा बदलून पिवळा रंग तसाच ठेवून सर्वात वरती हिरवा रंग त्यामध्ये 8 कमळ होते.  मध्यभागातील पिवळ्या रंगामध्ये वंदे मातरम लिहिले होते. शेवटी भगवा रंग वापरला गेला त्यामध्ये एका बाजूला चंद्र दुस-या बाजूला सूर्य असे चित्र ठेवण्यात आले.
3.         1921 साली भारतीय ध्वज बदलून सर्वात वरती केशरी, मध्यभागी पांढरा, शेवटी हिरवा रंगाचा पट्टा अशी मांडणी करन मध्यभागी असणा-या पांढ-या चरख्याच्या चित्राचा समावेश करण्यात आला.
4.         22 जुलै 1947 रोजी तिरंगीध्वज अशोकचक्र असलेला ध्वजाचा स्वीकार करण्यात आला.

- मंगेश विठ्ठल कोळी.
- मो. ९०२८७१३८२०

No comments:

Post a Comment