Tuesday, September 27, 2016

स्वाभिमान आणि आत्मविश्वास

आजच्या तरूण पिढीला काहीही समजत नाही असे वाक्य आज सकाळी माझ्या कानावर पडले. तेव्हा मला असे लक्षात आले की, अनेक कामे उत्तम, सोप्या आणि वक्तशिरपणे करण्याच्या धडपडीमध्ये सर्वात पुढे तर हिच तरूण पिढीच आहे. चांगले  लोक आणि चांगले विचार तुमच्या बरोबर असतील तर जगात कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही. हे आजच्या तरूणांनी ओळखले आहे त्याच बरोबर त्यांच्याकडे असणारा स्वाभिमान आणि आत्मविश्वास याच्या जोरावर अनेक स्वप्न साकार करण्यासाठी मेहनतीच्या रुपात किंमत मोजण्याची तयारी ही आजची तरूण पिढीकडे आहे. त्यामुळे ते करत असलेले काम कोणालाही सांगू देता ते केलं जावू शकते. आजच्या युगात केले होऊ शकत नाही असा काही प्रकारचं उपलब्ध नाही. जर तुमचा विश्वास देवावर असेल तर जे नशीबात लिहिलय ते नक्किच मिळणार परंतु जर विश्वास स्वत:वर असेल तर देव सुध्दा तेच देतो जे तुम्हाला हवं आहे.
किती माणसं आपलं आयुष्य या गैरसमजूतीमध्ये व्यतीत करतात की, त्यांना फसवल जाऊ शकतं. परंतु माणसाला स्वत:शिवाय दुसऱ्या कोणाकडून फसवलं जाणं अशक्य आहे. जस एखादी गोष्ट एकाच वेळेस असावी की नसावी हे सुध्दा आपल्याला ठरविता आले पाहिजे. आत्मविश्वास बाळगणारी व्यक्ती नेहमी स्वत:च्या मेहनतीने यशाचे शिखर गाठण्यासाठी निर्विवाद योग्यता माणसाजवळ आहे यापेक्षा दुसरी प्रेरणादायी गोष्ट काही असू शकते का. आत्मविश्वास असणारी व्यक्तीची चिकाटीची जागा जगात कुठलीच गोष्ट घेऊ शकत नाही. कुठलीच प्रतिभा, कुठलीच बुध्दीमत्ता, कुठलीच विव्दत्ता, काहीच नाही चिकाटीसमोर कोणीच उभा राहू शकत नाही. स्वाभिमानी व्यक्ती धाडस किंवा हिंम्मतीने कार्य करते, भीती हा गुण माणसाच्या अस्तित्वासाठी अनिवार्य आहे. फक्त भीतीवर नियंत्रण ठेवून भीती वाटत असतानाही जे कृती करतात त्यांनाच जग धाडसी म्हणून ओळखते हे लक्षात ठेवा.
आत्मविश्वासू व्यक्ती कोणत्याही गोष्टीला किंवा घटनेला महत्व, किंमत तेवढीच देतो जेवढी प्राप्त होते. एखाद्या घटनेचा कसा अर्थ लावता, त्यावर तुमची प्रतिक्रिया अवलंबून असते. स्वत:चा बघण्याचा दृष्टिकोन निवडल्या नंतर एखाद्या घटनेचा परिणाम काय व्हावा हे घटना ठरवत नाही तर स्वत: ठरवतो. माणसाला जिंकायचे असेल तर केवळ आपुलकीने कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखादे वेळेस साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव, स्वाभिमानी आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही. जो पर्यंत तुम्ही पाऊल उचलणार नाही तो पर्यंत तुम्ही त्याच जागेवर राहाल आणि जितक्या लवकर कामाला लागाल तितक्या लवकर तुम्ही यशोशिखरापर्यंत पोहचाल असा निश्चय करुन घ्या. जे करायचंच आहे ते लगेच करायचं आहे, जोपर्यंत तुम्ही काही करणार नाही तो पर्यंत तुमची स्थिती सुधारणार नाही.
काहीच नसण्यापेक्षा काही तरी असणं, हे केव्हा हि चांगल असतं. अपयश येईल या भीतीने मुर्ख माणूस कामाचा आरंभच करीत नाही. एखाद्या कामात थोडासा अडथळा निर्माण झाला की, सामान्य माणूस निराशेपोटी ते काम अर्धवट सोडून देतो. परंतु आत्मविश्वास व्यक्ती मात्र कितीही संकटे आली, अपयश मिळाले तरी यश मिळेपर्यंत थांबत नाही. आयुष्यात ख्‌ूप माणसे भेटतात, वाऱ्याच्या झुळका प्रमाणे येतात आणि जातात. तुम्ही जेव्हा कोणासाठी काही चांगल करत असता, तेव्हा तुमच्यासाठी सुध्दा कोठेतरी काही चांगल घडत असतं इतकच की ते तुम्हाला लगेच दिसत नसतं. आत्मविश्वास असलेल्या मनुष्यासोबत काम करण्यात आनंद वाटतो कारण तो नेहमी इतरांशी मिळून मिसळून वागतो. आत्मविश्वास कमी असणाऱ्या व्यक्तींना थोड्या प्रेरणेची, प्रोत्साहनाची आवश्यकता असते. त्यांच्यामधील शक्तीची त्यांना कोणी जाणीव करुन देताच ती सुप्त शक्ती तात्काळ प्रकट होते आणि ते विस्मयकारक कार्य पार पाडू शकतात.
नवीन आव्हाने आणि जबाबदाऱ्या स्वीकारण्यास अजिबात घाबरु नका, मला शक्य होणार नाही असे कधीच म्हणू नका. चालून येत असलेल्या संधीचे व्दार स्वत:च्या हातांनीच बंद करू नका, इतरांना जमू शकत असेल तर मला का जमणार नाही नक्कीच जमेल असा आत्मविश्वास अंगी बाळगा. एखादी गोष्ट आपण करु शकतो हा विश्वास निर्माण करण्याचा खात्रीचा मार्ग म्हणजे एकदा ती गोष्ट करुन पाहणे होय. एकदा काही करण्यात यशस्वी झालो की, पुन्हा यशस्वी होऊ शकतो हा विश्वास आपोआप पाढीस लागतो. वाट पाहू नका सुरवात करा, सुरवात करण्यासाठी तुम्हाला अगदी हवी तशी वेळ कधीच येणार नाही. जिथे तुम्ही आहात तिथून जी साधने तुमच्याकडे आहेत त्यांना घेऊन सुरवात करा आणि तिही आत्ताच. वेळ ही जीवनात कधीच परत येत नाही हे लक्षात ठेवा आणि कोणतेही कार्य करत असताना ते स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने करा.