Wednesday, August 26, 2020

तुमचं हक्काचं ठिकाण...

"अग तुझा चेहरा आज असा का दिसतोय?"

" काही नाही गं..."

" नाही कसं ? काय झालंय..बोल न .."

आणि मग मनात साचलेलं सगळं मळभ तिच्याजवळ रिकामं होतं..एखादी गच्च कोंबून भरलेली बॅग रिकामी करावी तसं आणि  मग जादूची कांडी फिरवल्यागत मन क्षणार्धात एकदम मोकळं होऊन जातं..

हेच.. हेच ते *हक्काचं ठिकाण.. My Happy Place !!* 

         फक्त आठवून बघा अशी कोणती  हक्काची ठिकाणं आपल्या जवळ आहेत ?? मनाला उभारी , खराखुरा विसावा देणारी .. एक एक आठवत चला.. एकदम फ्रेश वाटेल !! त्या व्यक्तीसोबतचे संवाद किंवा गमतीजमती एखाद्या सिनेमासारख्या तुमच्या डोळ्यांपुढून तरळून जातील..कुठल्या एखाद्या मैत्रिणीसोबत मन हलकं फुलकं होतं तर एखाद्या मित्रासोबत खळखळून हसल्या जातं , भावा सोबत बालपणीच्या आठवणी, चिडवाचिडवी..तर एखाद्या नातेवाईकांसोबत साहित्यिक चर्चा...sooo coool असं feeling देणारी ही ठिकाणं !!

              अशी मोजकीच पण हक्काची ठिकाणं प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच असतात..आई वडील तर खास हक्काचेच.. त्याशिवाय मित्र ,मैत्रीण ,भाऊ ,बहीण,

भावजय,दीर,नणंद , cousins ,नातेवाईक .. कुणीही असू शकतं  तुमचं *हक्काचं ठिकाण , Your true Happy Place !!*

     जिथे आपुलकी, जिव्हाळा तर असतोच, पण सोबत असते संजीवनी.. मनाला जिवंत करणारी !! किंवा अगदी एखादा  *व्हॉट्सॲप ग्रुप* सुद्धा.. जिथे नुसतं डोकावलं, नुसता एक virtual  फेरफटका मारला तरी मन एकदम relax होतं !

           निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर एकदम फ्रेश वाटतं तसंच आपल्या या हक्काच्या ठिकाणी.. त्यांच्या सहवासात एकदम relax, fresh वाटतं.. मन  हलकं हलकं होऊन जातं.. अगदी मोरपिसासारखं !! तिथे कुठलाच आडपडदा नसतो  किंवा  show-off ही नसतो.. अगदी मनातलं हृदयातलं सहज बोलता येतं, व्यक्त होता येतं... कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे  तुमच्या अशा हक्काच्या ठिकाणी तुम्हाला समजून तर  घेतल्या जातंच पण महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ह्यांच्याकडून Judge केल्या जात नाही ! आणि म्हणूनच अशा व्यक्तींच्या सहवासात तुम्हाला अगदी निवांत.. मन मोकळं वाटतं..

*"तुमको देखा , तो ये खयाल आया*

*जिंदगी धूप , तुम घना साया !!"*

        ही हक्काची  ठिकाणंही अगदी अशीच..सावली देणारी ,विश्रांती देणारी.. थकल्याभागल्या  जीवाला आणि मनाला !!आणि गंमत म्हणजे अशी माणसं आरशासारखी असतात.. गुण आणि दोष दोन्ही दाखवणारी..म्हणून जास्तं विश्वास !! 

         अशी हक्काची ठिकाणं अगदी जीवापाड जपूssssन ठेवायला हवीत.. हिऱ्या माणकां पेक्षा जास्त !! ती हरवायला नकोत,आयुष्याच्या गडबडीत.. कारण यांची फक्त साथही लाख-मोलाची !! Loneliness किंवा एकटेपणा दूर करणारी..म्हणूनच *"तुझ्याशी बोलून खूssssप बरं वाटतं"* हे त्यांना नक्की सांगायालाच हवं .

       कुणाचीही आत्महत्या कानावर आली की वाटून जातं  की मन मोकळं करायला त्यांच्या जवळ असं एकही हक्काचं ठिकाण नसेल ? जिथे अगदी खरंखुरं व्यक्त होता येईल?कारण व्यक्त होणं ही प्रत्येकाचीच सर्वात मोठी गरज !! त्याशिवाय मोकळा श्वास कसा घेता येणार ? 

        आपण आपल्या आयुष्यातली सगळी हक्काची ठिकाणं तर जपावीच पण आपणही कुणाचं तरी हक्काचं ठिकाण नक्कीच असायला हवं... !! नाही का ?

*खूsssssप बरं वाटलं ना वाचून? मग friends आणि सर्व हक्काच्या ठिकाणांना  जरूर शेअर करा आणि सांगा 'खूsssप बरं वाटतं तुझ्यासोबत' !!*

6 comments:

  1. मंगेश, खूपच छान....!

    ReplyDelete
  2. खरंच. आपले मन मोकळे करायला आयुष्यात हक्काचं कुणीतरी असावचं. छान प्रबोधनपर माहिती.
    R.D.Sonawane Sir. Bhusawal.

    ReplyDelete
  3. सर खरंच खूप छान माहिती दिली आहे

    ReplyDelete