Monday, October 30, 2017

पालकत्व....


अनेकांना पालकत्व म्हणजे नक्की काय? हे समजावून सांगण्याची आवशक्यता समाजामध्ये निर्माण झाली आहे. मग प्रश्न उरतो तो हा की, यापूर्वी आजी-आजोबा किंवा आई-वडील यांना पालकत्वाची कल्पना नव्हती का? ते जे आपल्या बरोबर वागले? आपल्याला आताच्या परिस्थितीत जगण्यास लायक केले ते नक्की काय? तुम्ही आमच्यासाठी आता पर्यंत काय केले? याला पालकत्व म्हणायचे का? अशा अनेक प्रश्नांनी आजची तरुण पिढी संभ्रमावस्थेत आहे.
एका मित्राबरोबर फोनवर बोलत होतो. त्याला समुपदेशन करताना काही अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्या तो सांगत होता. पुढे तो म्हणाला; मी तुला एक फोटो पाठवतो, तो फोटो पाहून तुला काय वाटते ते सांग? कारण आजच्या तरुण पिढीला सर्वच गोष्टी कमीत कमी कष्टामध्ये उपलब्ध होत आहेत. त्यामुळे त्यांचा मानसिक दृष्टीकोन बदलत चालला आहे. नवनवीन तंत्रज्ञानाने भावनिकता किंवा जवळच्या व्यक्तीबद्दलचे भाव भावना कमी होत चालल्या आहेत. यावर कोणकोणत्या उपाय योजना करता येतील यावर आमची चर्चा सुरु झाली.
मित्राने जो फोटो पाठवला, तो पाहून आपण खूप मोठा मेसेज यातून समजाला देऊ शकतो असे मला वाटले, आज अनेक पालक हे मुलांच्या प्रेमाखातर स्वत:ला हवे तेवढे कष्ट घेतात. आपला पाल्य समाजात वावरताना, समाजात जो कृत्रिम मुखवटा घालण्याची पद्धत रूढ होत आहे. त्याला मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत. जसे की, पाल्य शाळेतून आला की, घरातील शाळा सुरु होते. शाळेतील दप्तर खाली ठेवल्या बरोबर घरात प्रश्न केला जातो. आज शाळेत काय शिकवलं? होमवर्क काय दिला आहे? टीचर काय म्हणाले? वगैरे वगैरे अशा प्रश्नांची सुरुवात होते. आता तर ऑनलाईन शिक्षणामुळे तर त्याचे प्रमाण जास्तच झाले आहे.
पाल्य रात्रीचे जेवण कसे बसे पार पडले की, लगेच होमवर्कची नोट बुक काढून त्याची घरातील शाळा सुरु होती. रात्री पाल्य झोपण्याची वेळ झाली तर, त्याला ओरडून कधी कधी तरी मार देऊन देखील होमवर्क पूर्ण केला जातो. तरीही तो पूर्ण होत नसेल, तर मात्र काही पालक स्वत: तो होमवर्क पूर्ण करतात. बाहेर इतर ठिकाणी पाल्यासोबत फिरायला गेले की, आपल्या पाल्याची इतर पाल्याशी तुलना केली जाते. त्यातून बऱ्याच अंशी पाल्यामध्ये नकारात्मकता वाढीस लागते. आपल्या पाल्याच्या मनातील नकारात्मकता कमी करायची असेल किंवा ती कायमची दूर करायची असेल. त्यावर नक्की काय करायला हवे? हे पालकांनी आणि पाल्यांनी जरुरू समजावून घेतले पाहिजे.
अनेक पाल्यांना वाटते की, आपल्याला मिळणारे पालकत्व अपुरे आहे. किंवा जे पालकत्व दिले जात आहे, त्याची किमत पाल्यांना बहुतांशी नसते. प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांना लहानपणी पालकत्व म्हणजे नक्की काय? कोणत्या गोष्टीला पालकत्व म्हणायचे? प्रत्येक जबाबदारी म्हणजे एक पालकत्वच असते? पालक जे पालकत्व करत आहेत. याची जाणीव आपल्या पाल्यांना करून दिली पाहिजे? अशा सर्व प्रश्नासाठी पालकांनी पाल्यांना किमान महिन्यातून एकदा किंवा जसा वेळ मिळेल तेंव्हा ज्या मुलांना पालक नाहीत, रस्त्यावर जी लहान मुले इतरत्र फिरत असतात, किंवा जे अनाथ आश्रमात राहतात. त्या ठिकाणी आपल्या पाल्याबरोबर भेटी दिल्या पाहिजेत. त्यावेळी त्याच्या लक्षात येईल की, त्यांना मिळत असलेले पालकत्व किती मोलाचे आहे. समजून सांगण्यापेक्षा त्यांना “बी प्रॅक्टिकल” सांगितलेले नेहमी उत्तम असे मला वाटते. हा प्रयोग प्रत्येक पालकांनी जरुरू करून पहावा. आणि आपल्या पाल्यातील पालकत्वाची भावना तपासावी.
-       मंगेश विठ्ठल कोळी.
-       मो. ९०२८७१३८२०

2 comments:

  1. खरंच आहे सर बि प्रॅक्‍टिकल व्हायला पाहिजे आपण आपल्या पाल्यांचे जास्त लाड पण करायला नको अनाथ बालकांना पाहून त्यांच्यामध्ये नक्की सहानुभूतीची भावना निर्माण होईल.

    ReplyDelete